Saturday, April 30, 2011

हा ब्लॉग बंद करीन!

हा ब्लॉग बंद करीन!
राजकारणात, समाजकारणात, सत्तेवर असलेल्या अनेकांवर वेळोवेळी अनेक प्रकारचे खरे वा खोटे आरोप होत असतात. सर्व आरोप नाकारलेहि जातात. ’माझ्यावरचा आरोप सिद्ध झाला तर मी हे सत्तास्थान सोडून देईन, राजकारण सन्यास घेईन राजीनामा देईन’ असे काहीबाही बोलले जाते. गंभीर आरोप सिद्ध झाला तर सत्तास्थान सोडून देणे हीच पुरेशी शिक्षा असे जनतेने समजावयाचे काय? ’आरोप सिद्ध झाला तर कायद्याने दिली जाणारी शिक्षा मी तक्रार न करता स्वीकारीन’ असे कोणी म्हणत नाही! मग तो पुडुचेरीचा लेफ्टनंट गव्हर्नर असो वा आणखी कोणी. बदनामीचा वा नुकसानभरपाईचा दावाही फार क्वचित लावला जातो.
मीहि म्हणतो माझ्यावर कोणी आरोप केला तर मला म्हणतां येईल कीं ’माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ते सिद्ध झाले तर मी हा ब्लॉग लिहिण्याचे बंद करीन!’

No comments:

Post a Comment