Thursday, April 28, 2011

एअर इंडिया

हे एक कायमचे आणि बरे न होणारे दुखणे झाले आहे. मिनिस्टर बदलले, मॅनेजिंग डायरेक्टर बदलले, एअर – इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स एकत्र केले वा वेगळेवेगळे केले तरी कोणतेही प्रष्न सुटत नाहीत. प्रचंड तोटा वर्षानुवर्षे होतोच आहे. दैनंदिन चालू खर्चाला पुरेल इतकेही उत्पन्न होत नाही. भारत सरकारला वेळोवेळी कोट्यावधि रुपये झोळीत टाकावे लागतात. झोळी ’दुबळी आणि फाटकी’ असल्यामुळे 'पोटापुरता पसा'हि पिकत नाही. तेव्हा 'पोळी' पिकण्याचा प्रष्नच नाही.
हे असेच कां चालू द्यायचे? त्यांत वर पगार- भत्ते वाढीसाठी हवें तेव्हां संप आहेतच. प्रवाशांची कोणालाच पर्वा नाही. आता तर नापास होणार्‍याना पायलट बनवण्याचा खेळ उघडा पडला आहे. तेव्हा जिवाची पण शाश्वति नाही. भारत सरकारने हा खेळ कशासाठी चालू ठेवावा? एकदाच एअर-इंडिया बंद करावी, विमाने फुकून टाकावी, स्टाफची व इतरांचीं जी काय देणी असतील ती द्यावीं आणि खेळ खलास करावा. मग देशातील वा परदेशातील खासगी कंपन्यांना विमाने परवडली तर चालवूं दे, परवडेल तेवढा पगार देऊंदे. राष्ट्रपति, मुख्यमंत्री, या दोघांचसाठी सरकारी विमान असावे. इतरानी जी सेवा जनतेला मिळत असेल तीच घ्यावी. नाहीतर बलवासारख्या कंपनी मालकांची खासगी विमाने आहेतच!
अमेरिकेकडे वा इंग्लंडकडे कुठे सरकारी मालकीच्या विमान कंपन्या आहेत? पुढील निवडणुकीत एअर-इंडिया बंद करण्यास तयार असलेल्यानाच मते द्या!

No comments:

Post a Comment