Sunday, April 17, 2011

जैतापुरला विरोध

सध्या जैतापुरला विरोध चालू आहे. जपानमधल्या भूकंपामुळे त्याला जोर आला आहे. कोणाही जाणकाराने कितीहि समजावून सांगितले तरी फरक पडत नाही. भूकंपाचे निमित्त पुढे येण्यापूर्वीहि विरोध होता तो मुख्यत्वे विस्थापिताना पुरेसा मोबदला व पुनर्वसन या मुद्द्यांवर होत होता व तो योग्यहि होता. मात्र ’कोकण उजाड होईल, सर्व फळ उद्योग नष्ट होईल’ वगैरे भरमसाठ घोषणाही होत्याच.
एन्रॉन च्या वेळीहि अशाच घोषणा होत्या. डहाणू प्रकल्पालाहि याच कारणांवरून विरोध होता. अर्थात एका रात्रीत एन्रॉन चा विरोध नष्ट झालेला आठवत असेलच. तसाच जैतापुरचाहि होऊं शकेल!
एन्रॉन व डहाणू दोन्ही प्रकल्प कही वर्षे चालू आहेत. या प्रकल्पांमुळे पर्यावरणावर व स्थानिक शेती, बागायती, फलोद्याने, मासेमारी यांचेवर काय परिणाम प्रत्यक्षात झाला आहे याची नि:पक्षपातीपणे पाहणी झाली आहे काय? कोण करणार? याउलट डहाणू प्रकल्पाला उत्तम व कार्यक्षम असल्याबद्दल अनेकवार अवॉर्ड मिळालेले वाचले आहेत. तरीहि डहाणूच्या प्रकल्पाची वाढ करण्याला परवानगी मिळत नाही. ती कोर्टदरबारी अडकली आहे. हे असेच चालणार का?

No comments:

Post a Comment