रोज वर्तमानपत्रे वाचताना वा बातम्या ऐकताना वा इतर वेळीहि काही सुचत राहातं जे लोकांसमोर मांडावं असं वाटतं. अशा विषयांवर वेळोवेळी येथे लिहिणार आहे. वाचकाना हा उपक्रम आवडेल आणि त्यांच्याहि विचारांना चालना देईल अशी आशा आहे.
Wednesday, April 6, 2011
अण्णा हजारे
हा सज्जन माणूस आपली प्रतिष्ठा पणाला लावून दिल्लीत आमरण उपोषणाला बसला आहे. दिल्ली ही लबाड राजकारणी आणि चमचे यानी भरलेली आहे. तिथे या खर्या सज्जन माणसाचा निभाव लागणे कठीण वाटते. वृत्तपत्रे आणि वाहिन्या दोन दिवस त्यांचेमागे राहतील आणि नवीन विषय मिळाला कीं त्याना सोडून दुसरीकडे धावतील. करप्शन सर्वानाच हवे आहे. सत्ताधार्याना व सत्तेच्या मागे धावणाराना पैसा मिळवण्यासाठी, उद्योजकाना बरेवाईट व्यवसाय करण्यासाठी राजकारण्यांची मदत हवी म्हणून, सामान्य माणसालाही साध्यासाध्या सरळ कामासाठीहि ते लागतेच. चुटकीसरशी करप्शन बंद झाले तर सरकारी नोकर बरेवाईट सर्वच काम करणे बंद करतील!मला ’सिंहासन’ या गाजलेल्या सिनेमातील, सीमाप्रष्न सोडवण्यासाठी उपासाला बसलेल्या स्वातंत्र्यसैनिकाची व त्याला चुटकीसरशी गुंडाळून ठेवणाऱ्या मुख्य मंत्र्याची आठवण येते.चार दिवसांनी अण्णाना इस्पितळात पाठवले जाईल व लोक त्याना विसरून जातील अशी मला भीती वाटते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
mi tumachya sobat aahe...........annaji
ReplyDeleteme ani mazya sarkhi barich yuva pidhi tumchya sobat ahe.........
ReplyDeleteI hope Anna will suceed the mission. the next step is equal education and economy.This two things can eradicate problems like population,caste,equality.
ReplyDelete