Monday, March 14, 2011

वंदे मातरम्

वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्र्गीत नव्हे पण त्याचे बरोबरीचे त्याचे स्थान आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात वंदे मातरम् म्हणण्यासाठी अनेकांनी मरेमरेतॊं लाठ्या खाल्या होत्या. फाशी जाणार्‍या हुतात्म्यांच्या तोंडी हे अखेरचे शब्द असत.
आमच्या पिढीच्या भावना या गीताच्या गौरवाशी गुंतलेल्या आहेत. पुढील पिढीतील अनेकांना त्याची जाणीव असणारच.
आज कशाचेहि विडंबन करण्याचा काळ आला आहे. सध्या World Cup च्या मॅचेस चालू आहेत. वर्तमानपत्रे पानेच्या पाने भरभरून मजकूर छापत आहेत. चांगले आहे! पण टाइम्स सारख्या वर्तमानपत्राने त्या पानाचे शीर्षक One-Day Mataram असे करावे? मला याचा भयंकर राग आला आहे. पण विचारतो कोण माझ्या रागाला?

No comments:

Post a Comment