Saturday, September 24, 2011

मन्सूर अली खान पतौडी

मन्सूर अली खान पतौडी
आजकालच्या मराठी पत्रकारितेचा नमुना पतौडीच्या मृत्युलेखांमुळे नजरेसमोर आला. अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख भोपाळचा नबाब असा केला गेलेला दिसला. त्याच्या क्रिकेटमधील असामान्य कामगिरीबद्दल खूप लिहिले गेले ते सर्व योग्यच आहे. अनेकांनी त्याच्याबद्दल आदराने व प्रेमाने लिहिले आहे. पण ’भोपाळचा नबाब?’
तो कधीच भोपाळचा नबाब नव्हता! त्याचे वडील इफ्तिकार अली हे हरयाणातील ’पतौडी’ नावाच्या लहानशा संस्थानाचे नबाब होते. त्यांच्या मृत्यूनंतर मन्सूर अली हे अखेरचे नबाब झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थान भारतात विलीन झाले व नबाबी सम्पली मात्र पद काही काळ चालू राहिले. मग इंदिरा गांधी यानी संस्थानिकांचे सर्व हक्क व पदव्या सम्पवल्यावर तेहि गेले.
मन्सूर अली खान यांची आई भोपाळच्या अखेरच्या नबाबांची मुलगी. संस्थान गेले तरी वडिलांच्या पश्चात नबाबपद तिच्याकडे आले. मात्र सर्व संस्थानिकांची पदे गेल्यावर भोपाळचे नबाबपद मन्सूर अली खान यांचेकडे कधीच आले नाही. तेव्हा ते ’पतौडीचे अखेरचे नबाब’ एवढेच खरे. भारतीय क्रिकेट्चे नबाब हेहि खरे! तो त्यांचा किताब कायम राहील.

No comments:

Post a Comment