Tuesday, September 20, 2011

गृहकर्जाची कागदपत्रे.

गृहकर्जाची कागदपत्रे.
महानगरपालिकेच्या कर्मचार्या!नी गृहकर्ज घेतले असेल तर ते फिटेपर्यंत घरावरील हक्क दर्शवणारी कागदपत्रे कार्यालयात ठेवावी लागतात. कर्ज पूर्ण फिटल्यावर तीं त्याना बिनतक्रार परत मिळावयास हवीत हे उघड आहे. मात्र निवृत्त होताना सर्व कर्ज फिटले तरीहि तीं वेळेवर मिळत नाहीत. अनेक हेलपाटे घालावे लागतात अशी तक्रार वर्तमानपत्रात आली. असेहि लिहिले गेले कीं संमतिपत्रावर सक्षम अधिकारी दीर्घकाळ सह्याच करत नाहीत म्हणून असे होते. तक्रार छापून आल्यावर सक्षम अधिकार्या ने खुलासा केला कीं माझ्याकडे दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. मग ज्याची तक्रार होती त्याच्या केसमध्येहि त्यानी दोन वर्षांपुर्वीच सही केली असे आढळले. तरीहि कागद कां परत केले नव्हते याची आता चौकशी करूं असेहि म्हटले गेले.

कारण काय हे लहान मूलहि सहज जाणू शकेल! पैसा घेतल्याशिवाय काहीहि होत नाही हा आपल्या सर्वांचा आता रोजचा अनुभव झाला आहे. पूर्वी अवैध कामासाठी पैसा मोजावा लागे आता वैध वा हक्काचे कामहि कमीजास्त पैसा मोजल्याशिवाय करायचेच नाही अशी, सरकारी, म्युनिसिपल वगैरे नोकरानी जणू शपथच वाहिलेली आहे. मग तो जन्माचा दाखला असो वा मृत्यूचा! सात-बारा वा सिटी सर्व्हे बद्दल तर बोलायची सोयच नाही. बॅंकेच्या खात्यातून पैसे काढावयास गेले तर टक्केवारी मागत नाहीत हे नशीब! आणखी पांच वर्षांनी कदाचित मागतील! मग बिनसरकारी Banks आमच्याकडे असें काही नाहीं अशी अभिमानाने जाहिरात करतील!

No comments:

Post a Comment