गेल्या दोन तीन वर्षाप्रमाणे यंदाहि १०वी चा रिझल्ट लागल्याबरोबर ८ अतिशय हलाखीच्या परिस्थितीवर मात करून ९०% च्या वर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती छापून त्याना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. यंदाहि मिळतो आहे असे कळते. सर्वच आठ विद्यार्थी-विद्यार्थिनी मदतीस सारखेच पात्र आहेत.
मला ही योजना आवडते याचे मुख्य कारण आपण चेक विद्यार्थ्याच्याच नावाने लिहावयाचा असल्यामुळे आपले पैसे कोठे जातील असा संशय उरत नाही! नाहीतर आजकालच्या जमान्यात कोणाचा भरवसा धरावा? विद्यार्थ्याना म. टा. स्वत: बॅंक अकाउंट उघडून देते व मग सर्व चेक त्या-त्या विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होतात. मला शक्य त्या देणग्या मी दिल्याच आहेत. मी वाचकाना आवाहन करतो कीं आपणही द्या.
म. टा. बरेच वाचतात पण बरेच लोक इतर वर्तमानपत्रे वाचतात त्यांच्या नजरेला ही योजना कदाचित येत नसेलहि. लोकसत्ता, सकाळ, सामना किंवा इतर प्रमुख पत्रांनी अशीच योजना स्वत: राबवावी वा म. टा. च्या योजनेला आपल्या पत्रातून जरूर प्रसिद्धि द्यावी.
मुंबईमध्ये अनेक ’ज्येष्ठ नागरिक संघटना’ आहेत. त्यानी आपल्या सभासदांच्या नजरेला ही योजना आणून देऊन या गरजू विद्यार्थ्याना देणग्या मिळवून देण्यास हातभार लावावा असे मला वाटते.
chhan aahe kalpana.
ReplyDeleteThanks for pointing it out
Can u please give link to the original news in maharashtra times? Do u have contact details of the concerned person?
look up in www.maharashtratimes.indiatimes.com
ReplyDelete