Monday, May 16, 2011

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक
सध्या या बँकेचे नाव गाजते आहे. डायरेक्टर बोर्ड बरखास्त करून प्रशासक नेमले गेले असल्यामुळे रोज तत्संबंधित राजकारण आणि अर्थकारणाबद्दल उहापोह होतो आहे.
ही बॅंक म्हणजे सहकारी साखर कारखान्याना भरघोस कर्जे देणारी आणि तीं बुडूं देणारी बॅंक म्हणून आपणा सर्वसामान्यांना माहीत आहे! इतका आकड्यांचा महापूर वर्तमानपत्रातून रोज वाहतो आहे पण अद्यापपर्यंत, म्हणजे सहकारी साखर कारखाने निघू लागले तेव्हांपासून आजपावेतो एकूण किती कर्ज या कारखान्यानी बुडवले आणि किती परत फेडले, कर्जाना सरकारी हमी असतेच मग त्यापोटी सरकारने एकूण किती रक्कम बॅंकेला भरपाईपोटी दिली हे स्पष्ट होत नाही. सरकारने दिलेली भरपाई ही आपल्या, जनतेच्या, पैशातून दिली हे विसरले जाते आहे. कारखाना दिवाळखोर झाला तर तो विकतानाही घोटाळे करून बॅंकेचे कर्ज वसूल होत नाहीच. मग हवी कशाला ही सहकारी साखर कारखानदारी आणि सहकारी बॅंक? सहकारी साखर कारखान्यांमध्ये बरेचसे भाग भांडवल सरकारचे, म्हणजे तुमचे-आमचेच, असते हे बहुतेकाना माहीत नसते! कारखाना दिवाळखोर होतो तेव्हा बुडणारे भागभांडवलहि बव्हंशी आपलेच असते! साखरेवर आधारलेले महाराष्ट्राचे राजकारण हे असे आहे.

No comments:

Post a Comment