Monday, October 10, 2011

श्रावण

श्रावण केव्हाच संपला, आश्विन चालू आहे पण आज अचानक मला श्रावणावर लिहायचे आहे. तोच श्रावण पण मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये वर्णनात फरक दिसतो.
मराठी कवि म्हणतात –
श्रावणात घन निळा बरसला – रिमझिम रेशिमधारा
किंवा,
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे॥

किंवा
श्रावणाच्या शिरव्यानी आनंदली धराराणी ...

याउलट हिंदी मध्ये –
बरसत गरजत सावन आयो री.....
किंवा
सावन घन गर्जे ...
किंवा –
सावनकी बूंदनिया, बरसत घनघोर
किंवा –
झुकि आयी बदरिया सावनकी ..

(या सार्‍या बंदिशि आहेत, हिंदी काव्याशी माझा परिचय नाही)

दोन्ही वर्णनात असा मोठा फरक कां असेल बरे, असा मला प्रश्न पडला. मग मलाच त्याचे उत्तर सुचले ते असे.
उत्तरेत श्रावण सुरू होतो तोवर आपला आषाढ अर्धा झालेला असतो. येथे तोवर पाऊस केव्हाच सुरू झालेला असतो. पहिला जोर थोडा कमी झालेला असतो. येथे श्रावण सुरू होईतों तो आणखीनच कमी झालेला असतो म्हणून रेशिमधारा किंवा रिमझिम
पण उत्तरेत पाऊस इथल्यापेक्षा साधारण २-३ आठवडे उशीरा सुरू होतो. त्यामुळे त्यांचा श्रावण सुरू होण्याच्या वेळेला पावसाची सुरवातच असते! त्यामुळे, बरसत घन घोर, बरसत गरजत सावन आयो ही वर्णने युक्तच आहेत.

2 comments:

  1. हा प्रकार हिंदी श्रावण मराठी आषाढाच्या कृष्ण प्रथमेला सुरू होत असल्याने घडतो.

    ReplyDelete
  2. मी तेच म्हटले आहे. सहमतीबद्दल धन्यवाद

    ReplyDelete